मुख्य पृष्ठ/आमच्याबद्दल
नैसर्गिक संसाधनांचा विकास व व्यवस्थापन, ग्रामोद्योग, महिला सक्षमीकरण, माहिती व तंत्रज्ञान, मानवी संसाधन विकास, कृषी व ग्रामीण विकास.
CARD संघटनेने विकास, आपत्ती निवारण व पुनर्वसनाच्या उद्देशाने केलेल्या कार्यातून त्यांचे योगदान स्पष्टपणे दिसून येते. स्थापनेपासून CARD मार्फत कृषी व शाश्वत ग्रामविकासाचे विविध प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत सुमारे ३०० युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन महानगरांतील विविध कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. स्माईल फाउंडेशन व KSWA-फ्युचर ग्रुप यांचे सहकार्य लाभले.
६० विधवा, परित्यक्ता व गरजू महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देऊन त्यांना मोफत शिलाई मशिन वितरित करण्यात आल्या. AFARM अंतर्गत उषा शिलाई स्कूलचे सहकार्य लाभले.
दुष्काळ निवारण कार्यक्रमांतर्गत बदनापूर तालुक्यातील २० गावांमध्ये सुमारे ८,००० मजुरांना मनरेगा योजनेद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. CARD ने ग्रामस्तरीय संस्था (VLO) म्हणून कार्य केले. जनसाथी दुष्काळ निवारण मंच यांचे सहकार्य लाभले.
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जालना, रायगड, नाशिक व कोल्हापूर जिल्ह्यांतील ३५ पाणलोट विकास समित्यांमधील ३,५०० शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षण देण्यात आले तसेच मृदा व जलसंधारणाची कामे राबविण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे सहकार्य लाभले.
कोविड-१९ महामारीदरम्यान जालना, बुलढाणा, उस्मानाबाद, नांदेड व पश्चिम मेलघाट भागातील ४,५०० गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. स्थलांतरित मजुरांसाठी सलग १३ दिवस अन्न पुरवठा करण्यात आला. २०० पोलीस कर्मचाऱ्यांना फेस गार्ड, हातमोजे, N-95 मास्क, सॅनिटायझर वितरित करण्यात आले. कोविड जनजागृती व आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली.
Syngenta India Limited, औरंगाबाद व CARD जालना यांच्या संयुक्त विद्यमाने ३ महिन्यांची आरोग्य तपासणी व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. बुलढाणा व जालना जिल्ह्यातील १०५ गावांमध्ये तापमान व ऑक्सिजन पातळी तपासण्यात आली. ७,५६० लोकांची कोविड चाचणी करण्यात आली.
आरोग्य, सुरक्षितता व पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. कृषी कचरा, शेण व पाण्यापासून शिवांश सेंद्रिय खत निर्मिती करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) यांच्या सहकार्याने २०११–१२ व २०१३–१४ या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात ५० मोफत विधी साक्षरता शिबिरे घेण्यात आली.
Syngenta India Limited च्या CSR निधीतून बुलढाणा जिल्ह्यातील सवंगी टेकाळे व वडगाव तेजन येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुसज्ज ग्रंथालये स्थापन करण्यात आली.
जल जीवन मिशन अंतर्गत नवापूर तालुक्यातील ४० गावांमध्ये प्रति व्यक्ती दररोज ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी CARD १५ जुलै २०२१ पासून अंमलबजावणी सहाय्यक संस्था म्हणून कार्यरत आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील ३४ व नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील १० गावांमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य २८ ऑगस्ट २०२१ पासून सुरू आहे.
मल्चिंग पेपरचा वापर करून उत्पादन वाढविणे व वापरानंतर त्याचे पुनर्वापरासाठी संकलन करण्यात येते. ठिबक सिंचन व मृदा परीक्षणाद्वारे सुमारे १,२०० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २० शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्भरणाचे कार्य करण्यात आले.
Center for Social Action (CSA), मुंबई व CARD जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै २०२० ते जून २०२१ या कालावधीत बालसभा मंच प्रकल्प राबविण्यात आला.
जुलै २०२४ पासून 'To Justice for Children' प्रकल्पांतर्गत नंदुरबार जिल्हा बालविवाहमुक्त व बालतस्करीमुक्त करण्यासाठी कार्य सुरू आहे. आतापर्यंत ६०० बालविवाह रोखण्यात आले असून ५४ बालमजूर व तस्करीग्रस्त मुलांची सुटका करण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांच्या CSR सहकार्याने नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आरोग्यविषयक प्रकल्प राबविण्यात आला. ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आधुनिक वैद्यकीय उपकरणे व २५५ आशा सेविकांना निदान साधने देण्यात आली.
या प्रकल्पांतर्गत पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कार्य करण्यात आले:
CSA, मुंबई व CARD जालना यांच्या सहकार्याने बालसभा मंच प्रकल्पांतर्गत २०२१ मध्ये ब्लॉकस्तरीय कार्यक्रम राबविण्यात आला. मुलांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करून नेतृत्वगुण विकसित करण्याचा उद्देश होता.
BPCL च्या CSR सहकार्याने बदनापूर व भोकरदन तालुक्यातील ४३४ आशा सेविकांना डिजिटल आरोग्य किट्स देऊन त्यांना सक्षम करण्यात आले.
डिजिटल थर्मामीटर, बीपी मशीन, पल्स ऑक्सिमीटर, वजनकाटा, उंची मापक व प्रशिक्षणाद्वारे आशा सेविकांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला.
या उपक्रमाचा परिणाम:
“लवकर निदान व योग्य उपचारांमुळे ग्रामीण समाज अधिक सक्षम झाला आहे.”
BPCL व CARD यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळाली आहे.
CARD ला मराठवाडा लोक विकास मंचाकडून स्व. मधुकर ढास स्मृती पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला.
कृषी विज्ञान केंद्र, जालना यांनी CARD ला कोविड काळातील अन्न सुरक्षा पुरस्कार २०२१ प्रदान केला.
भारत सरकारच्या आउटरीच ब्युरो विभागाने ३ वेळा प्रशंसा केली आहे.
Syngenta ने सन २०२१ मध्ये भाजीपाला उत्पादन क्षेत्रातील पर्यावरणीय शाश्वतता प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी निष्ठावान भागीदारीद्वारे अनुकरणीय वचनबद्धता आणि समर्पित सेवेबद्दल प्रशंसा केली.
महा NGO फेडरेशन – २०१९ मधील दुष्काळ निवारण कार्यासाठी सन्मान प्रमाणपत्र व रु. १०,०००/-
नेहरू युवा केंद्र, जालना, आउटरीच ब्युरो, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण.
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय, सामाजिक वन विभाग, राज्य महिला आयोग, जिल्हा परिषद नंदुरबार, अमरावती पंचायत समिती नवापूर व वरूड, BPCL.
Syngenta, East-West, Advanta, Reliance Foundation, Smile Foundation, AFARM, FES, CORO India, Maha NGO Federation इत्यादी.
अध्यक्ष प्रा. सुवर्णा दांडगे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. रामदास निहाल, सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड, संचालक अॅड. संतोष वानखेडे व CARD चे कर्मचारी समाजोपयोगी कार्यासाठी कार्यरत आहेत.
संदेश पाठवा
cardngo0908@gmail.com
संपर्क करा
+९१ ९०४९४२८०७८
मुख्य कार्यालय
सेंटर फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (CARD), पी.एन. १४, कपिलवस्तू हाउसिंग सोसायटी, सर्वे नं. ४५७, समंगाव रोड, राजपूतवाडी, जालना - ४३१२०३